Tarpa Mahotsav

Warli Painting

mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

updation in progress

Dahanu darshan

मोठ्या नकाशात Dahanu darshan [ Tribal tourism] पहा

निसर्गराजा, ऐक सांगतो!



पावसाळा सुरू झाला की निसर्गवेड्यांना वेध लागतात ते वीकएण्ड पिकनिक्सचे. प्रत्येकातच एक निसर्गवेडा लपलेला असतो. शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यात आपली नेहमीची कामं सोडून वारंवार निसर्गाशी गळाभेट घेता येत नाही. पण पावसाळ्यात मात्र निसर्गाला उराउरी भेटण्यावाचून पर्यायच उरत नाही. लोणावळ्यासारख्या टिपिकल पावसाळी ठिकाणी जाणारे फॅमिली टुरिस्ट असोत किंवा डोंगराच्या कडेकपाऱ्यांमध्ये निसर्गाच्या हिरव्या दुलईवरून मुक्तपणे फिरणारे भटके असोत, पावसाळा आला की स्वत:च्याही नकळत झपाटल्याप्रमाणे निसर्गाच्या कुशीत शिरायला आपण आतूर होतो.

हल्ली त्याच त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा नवी ठिकाणं शोधण्याकडे कल जास्त आहे. लोणावळ्यासारख्या ठिकाणी भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पाण्यापेक्षा माणसंच अधिक असतात. काही वर्षांपूवीर् याचा उबग येऊन अशाच काही भटक्यांनी अॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराच्या कुशीत दडलेला एक अप्रतिम धबधबा शोधून काढला. आता मात्र भुशी डॅम इतकीच या धबधब्यावरही गदीर् उसळलेली असते. शिवाय, दारूड्या पर्यटकांचा त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळेच लोणावळा, माळशेज घाट यांसारखी दृष्ट लावणारी ठिकाणं फॅमिली टुरिस्टना नकोशी झाली आहेत. शिवाय, ट्रेकर मंडळींनाही या ठिकाणांचं फार आकर्षण राहिलेलं नाही.

लोणावळ्याच्या तुलनेत खंडाळा मात्र अजूनही पर्यटकांच्या गदीर्पासून काहीसा लांब आहे. पर्यटकांपेक्षा ट्रेकर्सचा ओढा खंडाळ्याकडे जास्त आहे, तो इथले हिरवेगार डोंगर आणि इथल्या प्रख्यात ड्युक्स नोजमुळं. रेल्वे ट्रॅक सोडून हिरवीकंच वस्त्र ल्यालेल्या डोंगराच्या कुशीत शिरलं की, बाहेरच्या जगाची कणमात्र आठवण राहात नाही. आपल्या खांद्यापर्यंत उतरलेले ढग, सतत रिपरिपणारा पाऊस, थंडगार हवा, जिकडे पाहावं तिकडे हिरवाईचं साम्राज्य... निसर्ग असा मोकाट सुटलेला असतो की त्याचं हे मुक्त बागडणं बघून आपल्याही मनात हर्ष दाटून येतो. शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटणारे आपण तिकडे मात्र निसर्गाचा हात पकडून तो नेईल तिथे त्याच्याबरोबर जातो.

खंडाळ्यापर्यंत जायची इच्छा नसेल तर त्याच्या अलीकडेही काही चांगली ठिकाणं आहेत, जी अजून तरी पर्यटकांच्या गदीर्पासून लांब आहेत. नेरळला उतरायचं ते माथेरानला जाण्यासाठीच. माथेरानचा पाऊस ही खास अनुभवण्यासारखी चीज आहेच; पण माथेरानपर्यंत पोहोचायच्या आधी स्टेशनपासून १५ मिनिटांवरच भान हरवायला अनुभव देणारं ठिकाण आहे ते म्हणजे टपालवाडी. स्टेशनला उतरून रस्त्यानं माथेरानच्या दिशेने पायी निघालं की, १० मिनिटांत उजव्या हाताला एक तलाव लागतो. या तलावावरून पुढे चालत गेलं की सामोरा येतो तो टपालवाडीचा धबधबा. हा सर्व परिसरच तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. शुद्ध हवा, नजर पोहोचेल तिथवर हिरवं साम्राज्य, आकाशातून सुरू असलेला पावसाचा अभिषेक आणि शुभ्र दुधासारखा वाहणारा धबधबा आणि हे सर्व ठाण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावर.

असंच एक ठिकाण कर्जतला आहे. त्याचं नाव आहे कोंडाणा केव्ज. राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या या बौद्धकालीन गुंफा अतिशय देखण्या आहेत. कर्जत स्टेशनला उतरून एसटी किंवा सहा आसनी रिक्षाने कोंदिवडे गावाला उतरलं की तिथून पायी चालत तासाभरात या गुंफापाशी पोहोचता येतं. इथूनच पुढे राजमाचीला जायचा रस्ता आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकातल्या या गुंफा काळाचे घाव सोसत अजूनही उभ्या आहेत. एक चैत्यस्तूप आणि सात विहार यांचा समावेश असलेल्या या गुंफातील कोरीवकाम दृष्ट लागण्यासारखं आहे.

ज्यांना डोंगरदऱ्यांत भटकण्याची हौस नसेल त्यांच्यासाठी मुंबई-ठाण्याच्या आसपास अनेक समुदकिनारे आहेत. अलिबागच्या समुदकिनाऱ्यावरही माणसांची गदीर् उसळलेली असते. पण अलिबागला लागूनच असलेले आक्षी, नागाव आणि रेवदंड्याच्या किनाऱ्यांवर मात्र तुलनेने कमी गदीर् असते. वरून कोसळणारा पाऊस आणि समोर उधाणलेला समुद हे दृष्य मन मोहून टाकणारं आणि चित्तवृत्ती भारणारं आहे. रेवदंड्याच्याच पुढे कोरलईचा किल्लाही पाहण्यासारखा आहे. या किल्ल्यावरून अलिबागपर्यंतचा समुदकिनारा दृष्टीपथात येतो. इथेच दीपस्तंभही आहे. मात्र, या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यामुळे जेमतेम मोटारसायकली इथे जाऊ शकतात.

ठाणे जिल्ह्यात डहाणू, बोडीर्चा समुद वीकएण्ड पर्यटनासाठी आदर्श आहे. डहाणू हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील विभाग म्हणून घोषित करण्यात आला असल्यामुळे इथे एखाद दोन अपवाद वगळता मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर अद्यापि टिकून आहे. पालघर, सफाळे, डहाणू, बोडीर् हा सारा परिसर म्हणजे निसर्गाची खाण आहे.

या शिवाय, ठाणे जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणून ख्यातकीर्त असलेलं जव्हार हेही वीकएण्ड पिकनिकसाठी आदर्श ठिकाण आहे.
original at - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3127845.cms

India's global art, proudly Tribal art!

Dahanu darshan

visit dahanu

dahanu's mahalaxmi

AYUSH - warli artsists at "adishilp - 2009" @hyderabad