Tarpa Mahotsav

Warli Painting

mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

updation in progress

Dahanu darshan

मोठ्या नकाशात Dahanu darshan [ Tribal tourism] पहा

Kille_Raigad

Kille_Raigad.pps‎(1MB)‎

ओम भवती भिक्षांदेही !

भारताचा चेहरा जगासमोर कसा आहे ? हे घरबसल्या जाणून घेण्याचे इंटरनेट हे एक सोपे माध्यम. वेगवेगळ्या वेबसाईटवर दिलेल्या माहितून भारत कसा आहे किंवा विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निरक्षणातून भारताचे वर्णन व्यक्तिगत ब्लॉगमध्ये कशाप्रकारे नोंदले आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारताविषयी अनोखी माहिती समोर आणतो. आपलाच देश आपल्याला अनोळखी वाटू लागतो. मात्र, भिकारी- भिखारी आणि बेगर्स यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधत असताना "भारत हा भिकाऱ्यांचा देश आहे आणि तेथे भिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी पुढील टिप्स लभात ठेवा' असे जेव्हा वाचनात आले, तेव्हा अस्वस्थ झालो. त्याच मनःस्थितीत नोंदलेल्या इतरही माहितीचा या "दखल' मध्ये उहापोह...

जळगावचे प्राध्यापक डॉ. सुनील मायी यांचे "आलो जन्मभरी मागाया' हे छोटेखानी पुस्तक साधारणतः सहा महिन्यांपूर्वी वाचनात आले. भिकाऱ्यांच्या विषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्यात आहे. भिकाऱ्यांचे तीन- चार इरसाल कॅरेक्‍टर लेखकाने उभे केले असून, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या भिकाऱ्यांचे प्रातिनिधीक चित्रण त्यात आहे. वेगळ्याविषयावरील रंजक माहिती असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून संपले. त्यानंतर या विषयाचा विसर पडला. "भुसावळमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली' अशी बातमी तीन- एक महिन्यापूर्वी वाचनात आली. या भिकाऱ्यांमध्ये "गर्दूल्ले' जास्त आहेत, असाही संदर्भ होता. पुन्हा विषय स्मृतीबाहेर गेला.
इंटरेटवर विविध विषयांची माहिती शोधण्याची मला सवय आहे. एकेदिवशी सहज भिकारी- भिखारी आणि बेगर्स हे शब्द गुगलवर ऑपरेट करुन माहितीचा शोध घेतला. समोर आलेल्या वास्तवाने उडालोच. प्रवासी आणि पर्यटनाशी संबंधित अनेक वेबसाइटची यादी समोर आली. भिकारी आणि पर्यंटनाचा काय संबंध ? उत्सुकता वाढली. "भारतात पर्यटनाला जाता आहात ?' असा प्रश्‍न करीत पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या विषयी या वेबसाईटवर अनेक टिप्स दिलेल्या होत्या. त्यात भारतातील भिकाऱ्यांपासून सावध ! असा इशारा नोंदलेला होता. इंडिया ट्रॅव्हल टिप्स, वर्ल्ड ऑफ इंडिया आणि इंडिया डॉट ट्रॅव्हल डॉट एजन्ट डॉट कॉमवर या टिप्स वाचता आल्या.या तीनही वेबसाईटवर भिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या 5 ते 7 टिप्स होत्या. भारतात अपंग वृद्ध- महिला- मुले भिक मागतात मात्र काही देखावा करतात,उपाशी मुले दाखवून भिक मागणाऱ्या महीला असतात, वाहनातून उतरल्यावर लगोच काही देवू नका तर परत जाताना द्या, मुलांना भिक देतांना बावनासील होवू नको कारण त्यांचे पालकच त्यांना तसे करण्यास सांगतात, मुलांना रोख स्वरुपात भिक देवू नका कारण पालक ती हिसकावून घेतात, काही करावेसे वाटलेच तर स्वयंसेवी संस्थांना मदत करा अशा अनेक टिप्स वाचनात आल्या. भारताच्या पर्यंटन विषयक आणि समाजिक चेहऱ्याचे विद्रुपिकरण या वेबसाईटच्या माध्यममातून कसे होत आहे ? असा प्रश्‍न मनांत निर्माण झाला. त्यावेळी प्रा. श्री. मायी यांच्या पुस्तकातील अनेक निरीक्षणे आठवली. मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाग- बगिचे अशा सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या भिकाऱ्यांची गर्दी आठवली. या ठिकाणांशी भारतीय पर्यटनस्थळे थेट संबंधित आहेत, त्यामुळे तेथे दिसणारा भारत वेबसाईटच्या माध्यमातून व्यक्त होतो हे लक्षात आले. कामत डॉट कॉम या ब्लॉगवरही भिकाऱ्यांच्या विषयी अशीच मात्र, भारतीय संस्क
ृतीचे चुकीचे दर्शन घडविणारी माहिती आढळून आली. लेखकाने अत्यंत अर्धवट माहितीवर निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो, "भारतात भिकारी परंपरेने तयार होतात. हिंदू साधू होण्यासाठी प्रथम भिक मागता आली पाहिजे'. ही माहिती सुद्दा चेहरा बिघडवणारीच वाटते.
भारतातील तपस्वी, विद्वान साधू- महंतांच्या प्रतिमांना छेद देणारे हे लेखन अस्वस्थ करते. भारतीय संस्कृतीत "भिक्षा मागणे' हा सुद्धा एक संस्कार आहे, याची माहिती कोणीतरी असा अर्धवट लेखकांना द्यायला हवी. अध्ययन करणारा ब्रह्मचारी आणि सर्व सुखांकडे पाठ फिरवणारा संन्याशी यांना पोटापुरती भिक्षा मागण्या हक्क संस्कृतीने मान्य केला आहे. गुरूदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी, विवाह- यज्ञ किंवा आई- वडील यांच्या पोषणासाठीही भिक्षा मागणे योग्य मानले गेले आहे. आपले दैन्य घालविण्यासाठी राजा किंवा धनिकाकडे याचना करण्यासही संस्कृतीची मान्यता आहे. उपनयन संस्कार (मौंज) करताना आचार्यांनी बटूला ब्रह्मश्‍चर्याविषयी उपदेश केल्यानंतर मातेकडे बटूने भीक्षा मागण्याचाही संस्कार केला जातो. पहिल्या भिक्षेवरही आचार्यांचाच अधिकार असतो. भारतीय संस्कृती दर्शनातील या बाबीही ठळकपणे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. याचा अर्थ या प्रथा- परंपरांचे समर्थन करण्याचा हा किंवा त्या योग्यच असल्याचा दावा करण्याचा येथे प्रयत्न नाही हेही येथे स्पष्ट व्हावे. खरेतर भारतीय संस्कृती कोषात "भिक्षा' शब्दाची व्याख्या अत्यंत समर्पक शब्दांत दिली आहे. तेथे तर्कतीर्थ म्हणतात, शरीर धडधाकट असूनही लोकांकडे अन्न, वस्र, पात्र, द्रव्य याची याचना करणे म्हणजे भिक्षा मागणे.
इंटरनेटवर "भिकारी' विषयावरील शोध मोहिमेत आणखी काही वेगळे संदर्भ आढळले. भारताची राजधानी असलेल्या नवीदिल्लीत सन 2007 मध्ये भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे लाखभर भिकारी आढळले. त्यापैकी 4 पोस्ट ग्रॅज्युएट, 6 पदवीधर, 796 बारावी उत्तीर्ण होते. एकूणपैकी 799 पुरूष व 1541 महिला शरीरिकदृष्ट्या पूर्णतः धडधाकट होत्या. यातील काही भिकाऱ्यांचे रोजचे उत्पन्न (कमाई ?)500 रुपये होती.
ंमधील भिकाऱ्यांच्या संदर्भात अशीच एक आकडेवारी लक्षवेधून गेली.सन 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात नवीदिल्लीत 60 हजार, मुंबईत 3 लाख, कोलकत्यात 75 हजार, बंगळूरमद्ये 56 हजार भिकारी आढळले. हैदराबाद महानगराच्या बाबतीत असा निष्कर्ष आहे की तेथे दर 375 माणसांच्या पाठीमागे एक भिकारी आहे...आता बोला. हीच गंमत मुंबईच्या संदर्भात आहे. 1996 मध्ये तेथे 20 हजार भिकारी होते, आज तेथे 6 लाख भिकारी आहेत. मुंबईत भिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक किती रुपयांची उलाढाल होते ? याची आकडेवारीही राज्यशासनाने जाहीर केली आहे आणि तो आकडा आहे...180 कोटी मात्र. सांगली पोलिस दरवर्षी भिकाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करतात.
काही श्रीमंत भिकाऱ्यांच्याही नोंदी आढळल्या. अहमदाबाद येथे एका भिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपण्याच्या कापडात 44 हजार रुपये कॅश मिळाली होती. तेथेच भद्रकाली मंदिराजवळची एक भिकारी महिला नातवास खर्च करण्यासाठी रोज 50 रुपये देत होती. सांरगपूरच्या एक भिकाऱ्यांने समाजिक कार्यात सव्वालाखांची देणगी दिली होती.
हे सारे संदर्भ वाचताना गंमत वाटत होती. भिकारी हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केले तरी, विदेशी पर्यटकांना त्यांच्या रुपात भारताची ओळख होत आहे या विषयी खेदही वाटत होता. पुन्हा प्रा. श्री. मायी पुस्तकातील एक सूचना मार्गदर्शक वाटली. ती म्हणजे, महानगरांमध्ये भिकाऱ्यांसाठी "बेगर्स होम' उभारले गेले पाहीजेत. जळगावमध्येही या सूचनेवर महापालिका व स्वयंसेवी वेगळा विचार करायला काय हरकत आहे ?

सदराशी संबंध नसलेली गोष्ट

एका आयटी कंपनीच्या समोर भिक मागणाऱ्या भिकाऱ्यास त्या कंपनीतील बडा अधिकारी 50 रुपयांची नोट देत असे. भिकारी त्याला हसून नमस्कार करायचा. काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्यांने 50 ऐवजी 20 ची नोट देणे सुरू केले. भिकारी ती नोट घ्यायचा आणि केवळ स्मित करायचा. पुन्हा काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्यांने त्या भिकाऱ्यास 10 रुपयांची नोट देणे सुरू केले. त्यावर निर्विकारपणे भिकारी त्या अधिकाऱ्यांस म्हणाला, "महाशय आपण काही अडचणीत आङात का ? आपण मला कमी रकमेची नोट देत आहात ?' तो अधिकारी म्हणाला होय, "पूर्वी माजे खर्च कमी होते. आता, माझा मोठा मुलगा उच्च शिक्षणाला गेला म्हणून मी 50 ऐवजी 20 रुपये देत होतो. त्यानंतर मुलगी कॉंलेजात गेली. तीचा खर्च वाढला म्हणून मी तुला 10 रुपये देत आहे' तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, "तुम्हाला अजून तिसरे मूल आहे का ?' अधिकारी म्हणाला, "होय. एक लहान मुलगा आहे.' त्यावर भिकारी परखडपणे म्हणाला, "महाशय, या तिसऱ्या मुलाचे शिक्षण मला देण्याच्या रकमेतून कृपया करु नका'.

original at -http://marathiblogs.net/node/44893


रानात, फुलात; कोकणच्या गावात!




हातात रिझव्हेर्शन, तारांकित हॉटेलातील बुकिंग, ठरीव न्याहरी-जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे किंवा रिझॉर्टमधील तेच वातावरण...यांच्या बाहेर पडून स्वत: सहल आखून कोकणासारख्या हिरव्यागार प्रांतात जाण्याचा अनुभव घ्यायला हवा. तिथल्या एखाद्या छोट्याशा गावात, निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना काही दिवस राहायला मिळणे आणि सर्वांनी मिळून समूहजीवनाचा अनुभव घेणे, यातली मजा काही औरच...

...........

मे महिन्याच्या भल्या मोठ्या सुटीत करायचं काय, या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पडणारा प्रश्ान्च असतो. दहावीत आणि बारावीत जाणाऱ्या मुलांना तर आता मे महिन्याची सुटी असते, असे आपण म्हणतच नाही. त्यांचा लगेच अभ्यास सुरूही होतो. पण इतर मुलांपैकी काही जातात छंद वर्गात. काही सचिन तेंडुलकरच्या फोटोच्या पाया पडून, कीटचे ओझे सांभाळत मैदानावर जातात. काही लिटल चॅम्प होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गाणे शिकायला जातील. अर्थात, हे सारे न करणारीही हजारो मुले असतातच.

काही कुटुंबांमध्ये आता विचार सुरू होईल बाहेरगावी जाण्याचा. एखाद्या सहल कंपनीमध्ये भरभक्कम पैसे मोजून आठ दिवसांसाठी जायचे. ते ही घरातल्या तिघांनी किंवा चौघांनी. मात्र, अशा सहलींमध्ये जी प्रेक्षणीय स्थळे मोठ्या माणसांना बघायची असतात, ती पाहण्यात लहानग्यांना अजिबातच रस नसतो. त्यामुळे त्यांची रड, कंटाळा, धुसफूस सांभाळत; कधी त्यांना रागावत तर कधी प्रेमाने समजावत सगळ्यांबरोबर दिवसभर फिरत राहायचे आणि रात्री तारांकित हॉटेलात डोळे मिटत असताना शिरायचे. लहानग्यांचे आणि आपले कपडे जमेल तसे पिळून टाकायचे. मोबाईलवर सकाळी सहाचा गजर लावून झोपायचे. आणि खर्च बराच झाला पण आराम आणि पाहणे खूप झाले, असे म्हणत स्वत:चीच समजूत काढत परत मुंबई गाठायची. दुसऱ्या दिवशी धावपळ सुरू.

खरे पाहता आपल्याला आवश्यकता असते सैलसर व स्वच्छंदी जीवन जगण्याची. काटेकोर धावपळीचा, रोजच्या पोशाखी वागण्याचा आणि रोज आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांचा कंटाळा घालवण्याची.

थोडा विचार केला तर यातून आपल्याला चांगला मार्ग काढता येईल. आपल्याला आणि मुलांना मनमोकळे व मनसोक्त राहता येईल. घरी असणाऱ्या महिलांनी मुलांचे बाबा सोबत आले तर त्यांच्यासहित किंवा त्यांना जमणार नसले तर त्यांच्याशिवाय, आपल्या समवयस्क मैत्रिणींचा छानछोटा ग्रुप बनवावा. हा गुप तीनचार जणींच्यावर मात्र नसावा. मग कोकणातल्या एखाद्या खेड्यातले घर १५-२० दिवसांसाठी भाड्याने मिळवावे. आसपास थोडी चौकशी केली तर कोकणातल्या कितीतरी गावांमधली अशी घरे उपलब्ध होऊ शकतील. कोकणाचा हा सारा परिसर अत्यंत रम्य तर आहेच पण तो अत्यंत सुरक्षित प्रदेश आहे. कोणत्याही गावात कोणत्याही वेळी तुम्ही बिनघोर राहू शकता. फिरू शकता. या गावांमधले गावकरी काही त्रास तर देणार नाहीतच उलट जमेल तेवढी मदत करतील.

कोकणात आज बऱ्याच सोयी आहेत. तालुक्यांच्या ठिकाणी सुपर माकेर्टपासून-बँकापर्यंत सगळ्या सोयीसुविधा आहेत. सर्व गावांमध्ये पिशवीतून दूध मिळते. बहुतेक गावांमध्ये आता नळपाणी योजना आहेत. तिथे गॅस सिलेंडरही सहज मिळतो. दूरध्वनी सेवा खेडोपाडी पोहोचली आहे. गरज पडल्यास, डॉक्टरही आहेत. पण त्यांची गरजच भासणार नाही. मुंबईहून नेलेली औषधेही न वापरता परत आणावी लागतील.

परीटघडीची बांधिलकी नसल्यामुळे मोकळा-चाकळा वावर व मुलांचे उघड्या अंगाने दिवसभर झाडामाडात हुंदडणे, गुराढोरांचा आणि झाडाझुडपांचा अनोखा प्रेमळ सहवास हे सारे वातावरण मुलांना अनुभवू दे. इन्फेक्शन आणि परीटघडीचे मॅनर्स यांचा मुळीच बाऊ करू नका. सगळ्या भीती विसरून मस्त राहात येईल. मैत्रिणी मैत्रिणी मिळून रोज नवनवीन पदार्थ करून मनसोक्त खाता येतील. अशा वातावरणात मुले न कंटाळता एकमेकांमध्ये मिळून-मिसळून दिवसभर खेळत राहतील. दिवसभर खेळून दमून त्यांना रात्री मस्त झोप येईल. सकाळी उठून ती पाहतील तर एखादी मनीमाऊ त्यांच्या अंथरूणात येऊन झोपलेली असेल. तुम्हीही पहाटे अंगणात येऊन बसलात तर तुम्हाला समाधी लागल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

कोकणात जायला आता भरपूर वाहतुकीच्या सोयी सहज उपलब्ध आहेत. रेल्वे आहे, खासगी बस आहेत, एसटी आहेत. आराम बसमधील प्रवासापेक्षा, साध्या एसटीतून अवश्य प्रवास करून बघा. एसटीचे जाळे आता अगदी छोट्या गावांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, एसटीच्या वेळापत्रकातही खूप नियमितता आली आहे. एसटीतून प्रवास म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क. या अशा संपर्काचा अनुभव मुलांना जरूर घेऊ द्यावा. त्यातून त्यांच्या संवेदना अधिक जाग्या होतील. कदाचित्, न दिसलेले जगही त्यांना या प्रवासात दिसण्याची शक्यता आहे.

असे हे मुक्त प्रवासाचे १५-२० दिवस तुम्हाला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा देतील. तुम्हाला व तुमच्या मुलांना हे निसर्गाच्या सहवासातले अनुभव नक्कीच समृद्ध करतील. तुमच्या माणूसपणाला नवा आराम मिळेल. एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, आपसात देवघेव करून, लहानसहान श्रम एकत्रित करून मुलांवर एक वेगळाच संस्कार नकळत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राज्यातील एक प्रदेश त्यांना 'आतून' दिसेल, हा आणखी एक फायदा. समूहजीवनाचा एक नवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

साऱ्या गोष्टी तयार आणि जिथल्या तिथे मिळण्याऐवजी स्वत: आखणी करून अमलात आणण्यातही मजा असते. ती मजा अशा ट्रिपमुळे अनुभवता येईल. मग विचार कसला करताय? जमवा मित्रमैत्रिणी आणि मुलांना घेऊन स्वत: सफरीवर निघा!

रिफ्रेश व्हायचंय?



पद्मश्री राव


वीकएण्डला अनेक जण छोट्या ट्रिप आखत असतात. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या ठिकाणांना प्राधान्य दिलं जातं. बरेचदा अशा ट्रिप एखाद्या बीचवर किंवा रिसॉर्टवर काढल्या जातात. पण एखाद्या धरणावर जाण्याचा बेत तुम्ही कधी बनवला आहे का? मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूरमध्ये एक सोडून दोन धरणं आहेत. बारवी डॅम आणि चिखळोली डॅम. या दोन्ही धरणांचा परिसर रम्य आणि शांत असल्याने एका दिवसात रिफ्रेश होण्यासाठी इथे जायला काहीच हरकत नाही.

.........

दशकभरापूवीर् ठाणे जिल्ह्यातलं देखणं आणि नेटकं गाव म्हणून बदलापूर प्रसिद्ध होतं. आता मात्र बदलापूरने कात टाकून शहरी रूप धारण केलं आहे. बदलापूर, अंबरनाथ ह्मद्ध गावांवर मुंबईचा प्रभाव पडल्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने झाला. बदलापूर आता शहर बनलं असलं तरी त्याने आपल्या 'गावपणा'च्या खुणा जपल्या आहेत. स्टेशनपासून आत गेल्यावर हे गाव एकेकाळी किती टुमदार, रमणीय असेल याची साक्ष मिळते. या परिसरात पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. विशेषत: एक दिवसाच्या सहलीसाठी ही ठिकाणं चांगली आहेत. बदलापूरच्या बारवी डॅमवर हौशी पर्यटकांची बरीच गदीर् दिसते.

बारवी हे उल्हास नदीवर बांधलेलं धरण आहे. इथलं निसर्गसौंदर्य आपल्याला मोहीत करतं. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर सगळीचकडे फिरता येत नाही. बारवी डॅमच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या निवास-भोजनाची व्यवस्था होतेे. बदलापूर स्टेशनपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे. हा सारा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे. उल्हास नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा एक पूल आहे. मात्र इथे पुलाखाली जाण्यास मनाई आहे.

सुट्टी असते तेव्हा अनेक जण एखाद्या बीचवर जाणं पसंत करतात. अलिबागचे सर्वच समुदकिनारे सुट्टीच्या दिवशी गजबजलेले असतात. परंतु थोडा बदल म्हणून एखाद्या वीकएण्डला मुंबईपासून जवळच असलेल्या बारवी डॅमला जायला काही हरकत नाही.

बदलापूरातलं आणखी एक धरण प्रेक्षणीय आहे. ते म्हणजे चिखळोली धरण. बारवी डॅमच्या तुलनेत कमी प्रसिद्ध असलेलं हे धरण बदलापूरच्या पूवेर्ला आहे. बदलापूर स्टेशनपासून सुमार सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. हे धरण छोटेखानी असलं तरी आजूबाजूचा परिसर मात्र प्रेक्षणीय आहे. बदलापूर स्टेशनपासून थेट रिक्षेनेही इथपर्यंत येता येतं. बारवी डॅम इतकी सुरक्षाव्यवस्था इथे नसली तरी हे धरण तुलनेत कमी धोकादायक आहे. तरीही पर्यटकांनी अगोदर माहिती घेतल्याशिवाय पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. चिखळोली धरणाचा परिसर अतिशय शांत आहे. इथे जाण्याची खरी मजा पावसाळ्यात आहे. कारण पावसाळामुळे फुललेली इथली हिरवळ भुरळ पाडते. पण पावसाळ्याखेरीज एरव्ही कुठलाही मोसमात चिखळोली धरणाला भेट द्यायला हरकत नाही कारण शांत ठिकाणी थोडा वेळ घालावायची इच्छा असणाऱ्यांना यासारखं दुसरं ठिकाण सापडणार नाही.

बारवी किंवा चिखळोली धरणावर जायचा बेत आखत असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवा:

* बारवी डॅमला जाण्यासाठी बदलापूर स्टेशनपासून बससेवा उपलब्ध आहे.

* चिखळोली डॅमला रिक्षाने जात येत असलं तरी रिक्षा परतीसाठी थांबणारी असावी. कारण परत जाण्यासाठी इथे कुठलंही वाहन उपलब्ध नाही.

* स्वत:चं वाहन असल्यास सहलीचा आनंद अधिक मोकळेपणाने लुटता येईल.

विक्रमगडचा निसर्ग खुणावतो!



तुम्हाला स्वत:चा शोध घ्यायचाय. रोजच्या धावपळीतून मस्त वीकेण्ड एन्जॉय करायचाय. नाहीतर समस्त जुन्या मित्रमंडळींच
ा झकास ट्रेकिंगचा प्लॅन आहे. शहराच्या धकाधकीपासून दूर कुठेतरी रम्य ठिकाणी जायचं असेल, तर मग तुम्ही नक्की विक्रमगडचा रस्ता धरा, असा सल्ला दिलाय ' बिनधास्त' शर्वरी जमेनिस हिने.

.......

ठाणे-जव्हार रस्त्यावर असलेला विक्रमगड हे माझं खास आवडतं ठिकाण. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने आम्ही कलाकार वेगवेगळ्या साइट, लोकेशन्स आणि शहरांमधे फिरत असतो. या ठिकाणांचं खास वेगळेपण, त्यांची वेगळी अशी ओळख, तिथे प्रसिद्ध असलेल्या वस्तू आणि पदार्थ यांचा शोध घेऊन हमखास त्यांना भेटी देणं ठरलेलंच. त्या त्या दिवसांपुरतं आम्ही तिथलं आयुष्य जगतो. पण शूटिंगमुळे हा नित्याचाच भाग झाला आहे. त्यामुळेच खास धमाल किंवा वेगळं काही अनुभवायचं असेल, मस्त फिरायचं असेल तर हटके अशा विक्रमगडला भेट द्यायलाच हवी.

ट्रेकिंगसाठी निघायचं म्हणजे खास आकर्षण असलेल्या रिव्हर क्रॉसिंग, जंगल सफारी, रॉक क्लायम्बिंग यांचाही आनंद इथे उपभोगता येतो. शिवाय इथली शांतता, निसर्गरम्य परिसर, नदीचे निर्मळ-स्वच्छ पाणी, शुद्ध हवा अगदी मन मोहून टाकणारी आहे. विक्रमगडावरील एका आदिवासी पाड्यावर दिवेकरांचं मस्त रिसॉर्ट आहे. खास ग्रामीण टच असलेल्या या रिसॉर्टवर धम्माल आणि मनमुराद जगण्याचा आनंद लुटता येतो. पण शांत आणि मोकळ्या वातावरणामुळे निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याचं समाधान मिळतं. या रिसॉर्टवर राहण्याची उत्तम सोय तर आहेच शिवाय अस्सल ग्रामीण टच असलेलं रुचकर जेवणही उपलब्ध आहे. या मोकळ्या वातावरणात आपल्याला मस्त सपाटून भूक लागते आणि या अस्सल चवीच्या जेवणाने वेगळंच समाधान मिळतं. मुंबईपासून अगदी जवळ शिवाय निसर्गाच्या सान्निध्यात एक-दोन दिवस राहून पुन्हा ताजं तवानंही होऊ शकता येतं. मग कधी निघताय 'भटकंती'साठी विक्रमगडला? इथला शांत परिसर अनुभवायला. स्वत:चा शोध घ्यायला?

- शब्दांकन : विनय उपासनी

माहुलीचा इतिहास जागवताना

माहुली किल्ल्याचा स्वराज्यात समावेश झाल्याला ३५१ वर्षं पूर्ण झाल्याबद्दल माहुली निसर्ग मंडळातफेर् शहापूर, तसंच
माहुलीच्या परिसरात 'माहुली महोत्सव' आयोजित केला होता. त्यानिमित्त माहुलीच्या इतिहासाला दिलेला हा उजळा.

......

महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच माहुली इतिहासाबद्दल फारसा बोलत नाही. भंडारगडावरील चोर दरवाजातल्या शिलालेखाव्यतिरिक्त कुठल्याही लिखित नोंदी माहुलीवर नाहीत. परंतु त्याचा ज्ञात इतिहास खरोखरच अभिमानास्पद आहे. या किल्ल्याचं बांधकाम शिलाहारांच्या काळात झालं, असा उल्लेख ठाणे जिल्हा गॅझेटिअरमधे सापडतो. परंतु माहुली किल्ल्याचाच एक भाग असलेल्या भंडारदुर्गावरील पाण्याच्या टाक्यावरून तो शिलाहारांपूवीर्च्या काळातही अस्तित्वात असावा. याला प्रमाण म्हणजे या पाण्याच्या टाक्याची बांधणी. अशी बांधकामं लेण्यांचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातवाहन कालखंडात केली जात.

किल्ल्याचा ठोस पुराव्यांवर आधारित इतिहास १४८५ पासून सुरू होतो. १४८५ मधे निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने कोकणातील इतर किल्ल्यांबरोबरच माहुलीचा किल्लाही ताब्यात घेतला. १६३५ मधे संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर शहाजी राजांनी निजामाचा शेवटचा वंशज मूतीर्जा याला निजामशाह म्हणून घोषित केलं. निजामशाही संपवण्यासाठी १६३५ मधे शाहजहान स्वत: महाराष्ट्रात उतरला होता. विजापूरच्या आदिलशहाला त्याने आपल्या बाजूला वळवलं. निजामशाही वाचवण्याच्या धामधुमीत पेमगिरी-जीवधनचा किल्ला सोडून शहाजीराजांनी लहानगा शिवबा आणि जिजाऊंसह माहुलीचा आश्रय घेतला. १९६३ मधे मुघल सेनापती खानजमान आणि रणदुल्लाखान यांनी माहुलीला वेढा दिला आणि शहाजीराजे आणि निजामशहाची कोंडी केली. ऑक्टोबर १६३६ तहामधे शहाजीराजांना माहुलीचा किल्ला खानजमान आणि रणदुल्लाखानाकडे सुपूर्द करावा लागला. निजामशाही बुडाली आणि त्याचबरोबर शहाजीराजांचे मराठेशाहीचं स्वप्न भंगलं. त्यांना आदिलशहाची चाकरी स्वीकारणं भाग पडलं. शहाजीराजांची बंगळूरला रवानगी करण्यात आली. त्यानंतर माहुलीचा किल्ला कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे ये-जा करत राहिला. १६५७ मधे कल्याण-भिवंडी फत्ते करून स्वराजाच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवून शिवाजी महाराज जातीने माहुलीवर चालून गेले. ८ जानेवारी १६५८ मधे शिवाजी महाराजांनी तो मोगलांकडून जिंकला आणि शहाजीराजांच्या पराभवाचे उट्टं फेडलं. पुढील केवळ आठ वर्षं माहुली स्वराज्यात होता. १६६५ मधे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात माहुलीचा ताबा पुन्हा मोगलांकडे गेला.

शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका होताच उत्तर कोकणाच्या मोहिमेदरम्यान शिवाजी महाराजांनी १५०० मावळ्यांसह जातीने रात्री अचानक छापा घालून माहुलीचा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण या मोहिमेत १००० मराठे कापले गेले. फारच जबर फटका महाराजांना बसला. मात्र महाराजांनी लवकरच संधी साधली. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुलीस वेढा दिला. सुमारे दोन महिने माहुलीस वेढा टाकून हल्ले सुरू होते. १६ जून १६७० रोजी निकाराचा एल्गार झाला आणि माहुलीवर पुन्हा एकदा मराठ्यांचे निशाण चढले, असं या लढाईचं वर्णन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं आहे. तेव्हापासून १८१७ मधील इंग्रज आणि पेशवे यांच्यातल्या पुणे तहापर्यंत जवळजवळ दीडशे वर्षं या किल्ल्याचं स्वामित्व मराठ्यांकडे होतं. एक अभेद्य तसंच महाभयंकर किल्ला (स्नश्ाह्मद्वद्बस्त्रड्डड्ढद्यद्ग स्नश्ाह्मह्ल) म्हणून या किल्ल्याचं वर्णन ठाणे जिल्हा गॅझेटियरमधे सापडतं.

१८१८ मधे कॅप्टन डिकन्सन नामक इंग्रज अधिकारी माहुलीवर आला. त्याने स्वत: फिरून माहुलीचं सवेर्क्षण केलं. सन १८१८ मधील कॅप्टन डिकिन्सनच्या भेटीपर्यंत गडावरील काही वास्तू शाबूत होत्या. मात्र १८६२ च्या आसपास किल्ल्याचं आणखी नुकसान झालं आणि किल्ल्यावरची तटबंदी जवळपास नष्ट झाली. माहुलीच्या दक्षिणेकडील एका घळीत एक दरीच्या तोंडाशी एक वैशिष्ट्यपूर्ण तुरुंग असल्याचं गॅझेटिअरमधे म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थित रायगडावर झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरील पाण्याने महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ३०० हून अधिक तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्याचे कुंभ रायगडावर आणले होते. राजांच्या समाधीवर अभिषिक्त होण्याचा पहिला मान होता तुळजापूरहून आणलेल्या जलकुंभाचा. त्यानंतर शिवनेरी आणि त्यानंतर महाराजांचं बालपण पाहिलेल्या माहुलीच्या गडगंगेला तिसरं मानाचं पान देऊन गौरवण्यात आलं होतं.

माहुलीवर आढळणारे घरांचे प्रशस्त चौथरे, तलाव तसंच मानवी वस्तीच्या खाणखुणा पाहत एकेकाळी या किल्ल्यावर प्रचंड वस्ती असावी. मात्र आता किल्ल्यावर उरले आहेत काही वीरगळ, भग्न तटबंदी, दगडधोंडे, चौथरे आणि मानवी वस्तीच्या खुणा दर्शवणारी आंबा, फणस, बकुळीची झाडं...

- रवींद पानसरे



original at - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4048980.cms


शांततेचा निवारा



-


शांत आणि खळखळ नाद करत जाणारी नदी हे खडावलीचं मुख्य आकर्षण. नदीचा मंद खळखळाट आणि गार वाऱ्याची झुळूक मनाला उभारी देते. ठाण्यापासून एक तासाच्या अंतरावर असलेलं 'खडावली' गाव रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी चांगला पिकनिक स्पॉट आहे.
.......

' जिथे शांतता निवारा शोधत येते

अशा एका तळ्याकाठी बसावेसे वाटते! '

कवी अनिल यांच्या या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर ठाणे जिल्ह्यातल्या खडावलीला एकदा भेट द्यायलाच हवी. गावातून वाहणारी नदी हे इथलं मुख्य आकर्षण. मंद खळखळाट करत वाहणाऱ्या नदीचं चमचमतं पात्र पाहिलं की एखादी अल्लड लहानगी दुडूदुडू धावत, डोळे मिचकावत आपल्याला बोलावते आहे असं वाटतं. नदीच्या किनारी वाऱ्याची थंड झुळूक स्पर्शून जाते. तिचा स्पर्श आणि नदीचा सूरमयी नाद आपल्याला आकषिर्त करतात. एका क्षणात मनाला आलेला थकवा निघून जातो. मनावर साचलेली धूळ उडून जाते. निसर्गाच्या जादूने आपण मंत्रमुग्ध होतो... रोज ट्रेन पकडायची, गदीर्चे धक्के सहन करायचे... या रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी 'रिचार्ज' होण्यासाठी खडावली हे उत्तम ठिकाण आहे.

पूवीर् या गावात खूप खड्डे होते म्हणून त्याला 'खड्डावली' म्हणू लागले. नंतर ते 'खडावली' झाल्याचं सांगितलं जातं. इथल्या नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दूरहून पर्यटक खडावलीला भेट देतात. नदीचा किनारा सोपा असून त्याची रचना सपाट खडकांची आहे. ही नदी शांत आणि उथळ असल्याने मुलांपासून, महिला आणि वृद्ध नदीत डुंबण्याचा आनंद घेऊ शकतात. तसंच किनाऱ्यावर चहा, भजी आणि वडापाव यांची छोटी टपरीवजा दुकानंही आहेत. पाण्यात मनसोक्त डंुबून हुडहुडी भरली की गरमागरम भजी खाण्याचा आणि सोबत कटिंग चहा पिण्याचा आनंद काही निराळाच असतो.

शांत वाहणाऱ्या नदीच्या किनारी स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे. इथल्या शांततेवर एक अध्यात्मिक अस्तर असल्यासारखं वाटतं. मठातला गारवा शांतता अधिक गहिरी करतो. टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेतल्यावर अनेक भाविक या मठात येतात. भाविकांना मठात ध्यानधारणा किंवा नामस्मरणही करता येतं. खडावलीच्या वेशीवरच हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान हे शक्तीचं दैवत असल्याने गावाचं रक्षण करण्यासाठी वेशीवरच हे मंदिर बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. या परिसरात दत्ताचंही छोटसं, सुंदर मंदिर आहे. हे मंदिरही पाहण्यासारखं आहे.

कसलेल्या गायकाने शांत, मंद गाणं गावं तशी खडावलीची नदी मंजुळ नाद करत वाहत असते... सगळ्या चिंता नदीच्या पात्रात काही वेळापुरत्या सोडून एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे किनाऱ्यावर बसून राहावं... शांततेचा उपभोग घेत!

....... .........

* इथे कसं पोहोचाल?

खडावली हे मध्य रेल्वेवरचं कसाऱ्याकडे जाताना टिटवाळ्याच्या पुढचं स्टेशन. इथे कसारा किंवा आसनगाव ट्रेनने जाता येतं. वाहनाने जायचं झाल्यास कल्याणहून टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्यावरून खडावलीला जाता येतं.

* काय काळजी घ्याल?

नदीचं पात्र किनाऱ्याजवळ शांत आणि उथळ असलं तरी काही ठिकाणी ते खोल आणि धोकादायक आहे. त्यामुळे पोहण्यासाठी जास्त पुढे जाऊ नये. जायचं झाल्यास तिथल्या जाणकार स्थानिकांचा सल्ला घ्यावा. नदीच्या पाण्याचा आनंद घेताना तिथेच कचरा करू नका. पर्यावरणाचा समतोल राखणं हे आपलं कर्तव्य आहे.

ओढाळ नाणेघाटाचा ट्रेक



कल्याणहून एक रस्ता मुरबाड, टोकवाडी, माळशेज घाट करत नगरला जातो. कल्याणहून साधारण चाळीस-पंचेचाळीस कि.मी.वरचं सरळगाव सोडलं की सगळा मुलुख बदलतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी भाताची शेतं, त्यात विसावलेली घरं हे दृश्य जाऊन निर्जन जंगल दिसू लागतं. बाहेरची विराटता आणि शांतता आपल्याला सगळं विसरायला लावून वेगळ्या प्रदेशात आल्याची जाणीव करून देते. त्यात उजवीकडे दूरवर दिसत असलेल्या सह्यादीच्या बेलाग डोंगररांगा आणि त्यातले काळेकभिन्न कडे आपल्याला होत असलेली जाणीव अधिक ठळक करत जातात.

हा आहे माळशेज घाटाच्या पायथ्याचा वैशाखरे, मोरोशी, सावणेर्चा ठाणे जिल्ह्यातला आदिवासी प्रदेश. या सगळ्यात उजवीकडच्या भल्यामोठ्या डोंगररांगेतून बाहेर आलेला एक मोठा कडा आपली नजर सतत वेधत असतो. विशेष म्हणजे खूप दूर असूनही त्याचं अस्तित्व आपल्याला ठळकपणे जाणवतं. त्याचं हे अस्तित्व नुसतं आकारामुळे नाही तर त्याच्या कित्येक वर्षांच्या अफाट कर्तृत्वामुळे आहे. हा कडा आहे 'नानाचा अंगठा' आणि त्याच्या बगलेतला त्यावेळच्या दख्खन पठारावरचा एक प्रमुख व्यापारीमार्ग 'नाणेघाट' आणि या दोघांच्याही मागे असलेला त्यांचा रक्षक 'जीवनधन' हा किल्ला.

आज या विराट आणि वैराण परिसराला आधुनिक सोयींचा पुसटसाही स्पर्श झाला नसला तरी फार प्राचीन काळापासून या परिसरात मोठ्या उलाढाली होत असल्यामुळे इथे मोठी सुबत्ता नांदत होती. सातवाहनांच्या आणि महाराजांच्या काळातही त्यावेळी जुन्नर ही दख्खनमधली मोठी बाजारपेठ होती. तर सोपारा आणि कल्याण ही नावाजलेली आंतरराष्ट्रीय बंदरं होती. या बंदरावरून उतरलेला सगळा माल नाणेघाटामागेर् देशावरच्या जुन्नरला जात असे. याची साक्ष पटवणाऱ्या अनेक खुणा आज भग्नावस्थेत असल्या तरी नाणेघाटाच्या तोंडावर एक माणूस आत बसू शकेल असा दगडी रांजण आजही इथे आहे. त्याकाळी यात रोजची जकात जमा होत असे.

नाणेघाटाचा ट्रेक हा डोंगरभटक्यांमध्ये अतिशय प्रिय आहे. मुरबाड-सरळगावच्या पुढे 'टोकावडे' हे या मार्गावरचं थोडंस मोठं गाव आहे. मात्र नाणेघाटात जाणारी पायवाट याच रस्त्यावरुन तीनेक कि.मी. पुढे गेल्यावर उजवीकडे आहे. याची खूण म्हणजे इथे उजवीकडेच 'ओतुर ४५' असा मैलाचा दगड आहे. त्यामुळे बसचं तिकिट वैशाखऱ्याच्या पुढच्या स्टॉपचं म्हणजे मोरोशीचं काढावं. टोकावड्याला बस कण्डक्टरला या जागी बस थांबवण्याची खास विनंती केली की आपली ही तीन कि.मी.ची चाल वाचते.

इथून उजवीकडे तिरकं बघितलं की नानाचा अंगठा समोर दिसतो आणि त्याच्या बाजूला दोन मोठे हाय टेंशन वायरचे टॉवर दिसतात. या टॉवरमधून इलेक्ट्रिक वायर्स खालच्या दरीत आलेल्या दिसतात. वर जाणारी वाट ही या सतत या वायर्सच्या खालून जाते. त्यामुळे उतरल्यावर पहिल्यांदा आपली दिशा निश्चित करण्यासाठी या टॉवर्सचा अंदाज घेतला पाहिजे. कारण वर जाणाऱ्या या वाटेव्यतिरिक्त सगळीकडे ताशीव कडे असल्याने वर जायला दुसरी वाट नाही.

या वाटेवर आल्यानंतर अगदी थोड्याच वेळात दोन वाटा आहेत. यातली एक मळलेली वाट डावीकडे जाते व दुसरी थोडीशी खाली उतरते. इथे मात्र सावध राहून खाली उतरणारी वाट पकडली की आपण सरळ नाणेघाटात पोहोचतो. सगळा रस्ता एकदम रूंद असला तरी दगडधोंड्यांचा आहे. रात्री ट्रेक करायचा असेल तर प्रत्येकाजवळ दोन अधिक सेल्ससह उत्तम विजेरी हवी. रमतगमत वरच्या गुहेपर्यंत जायला अडीच-तीन तास लागतात. बसमधून उतरल्यावर वर पोहोचेपर्यंत वाटेत पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. पावसाळ्यात मात्र या मार्गावर प्रचंड पाणी वाहत असतं. कोणीही कधीही घसरू शकतो. त्यामुळे सोबत प्रथमोपचाराचं साहित्य असणं जरुरी आहे.

याच नानाच्या अंगठ्याच्या कड्यात मध्यभागी एक मोठी चौकोनी गुहा आहे. यात सहज पंचवीस एकजण मुक्काम करु शकतात. गुहेच्या बाजूलाच पाण्याची पाच-सात टाकं आहेत. इथे बाराही महिने चांगलाच गारवा असतो. त्यात गुहेची जमीन म्हणजे कातळ असल्याने खाली अंथरायला कॅरीमॅट आणि पांघरायला स्लिपिंग बॅग असायला हवी. ही गुहा निर्जन असल्याने मुक्कामी असेल तर बरोबर पातेली, शिधा आणि मेणबत्त्याही हव्यात. मात्र जीवधनचा ट्रेक करायचा असेल तर सगळं सामान सोबत नेणं अत्यंत आवश्यक आहे.

नाणेघाटाच्या डोंगरमाथ्याहून उजवीकडे एक-दीड कि.मी.वर 'घटघर' हे छोटंसं खेडं आहे. इथून उजवीकडे साधारण पाऊणेक तास डोंगर चढल्यावर आपण 'जीवधन' (समुदसपाटीपासून ३७५४ फूट) या किल्ल्यावर पोचतो. वर डोंगरात पाण्याची टाकी आणि काही डोंगरात खोदलेल्या खोल्या आहेत. डोंगराच्या एका कडेवरून खालच्या बाजूला 'खडा पारशी' किंवा स्थानिक भाषेत 'वांदरलिंगी' नावाने ओळखला जाणारा प्रचंड सुळका आहे. घाटघरहून वरती जाणारी वाट काही ठिकाणी निमुळती आहे. जीवधनवरून उत्तरेला कळसूबाई, दक्षिणेला भीमाशंकरची पर्वतरांग, ईशान्येला हरिश्चंदगड, वायव्येला माहुलीचा किल्ला तर खालचं नाणेघाटाचं पठार, नानाचा अंगठा असा अतिशय भव्य आणि विराट देखावा दिसतो.

काहीजण याचबरोबर जुन्नरकडे असलेले चावंड, हडसर आणि शेवटी शिवनेरी असाही ट्रेक करतात. घाटघरहून जुन्नरला जायला दिवसातून ठराविक वेळी बसेस आहेत. ज्याने कोणी एकदा का नाणेघटचा हा भन्नाट ट्रेक आणि तिथल्या गुहेत मुक्काम केला की त्याचे सह्यादीतल्या या डोंगराशी ऋणानुबंध होतात. नाणेघाटची गुहा त्याला वारंवार बोलावत राहते. काही जागा असतातचं अशा ओढाळ आणि सह्यादीत तर अशा जागा अगणित आहेत.

भोराईच्या किल्ल्यावर



-


सह्यादीतल्या किल्ल्यांमध्ये 'सुधागड' आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख समर्थपणे टिकवून आहे. फार कमी जणांना हा ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ माहीत आहे. मराठ्यांच्या राजधानीच्या ठिकाणासाठी महाराजांनी जवळजवळ हे ठिकाण निश्चित केलं होतं. गडावरची विस्तृत सपाटी हे त्यातलं महत्त्वाचं कारण असावं. त्यादृष्टीने त्यावेळच्या प्रमुख विचारवंतांनी या परिसराची कसून पाहणीही केली होती. पण शेवटी निवड झाली ती रायगडाची. त्यावेळची मोगलांबरोबरच्या झगड्याची व्याप्ती लक्षात घेतली तर या ठिकाणचा राजधानी म्हणून केलेला विचारच या ठिकाणाची भौगोलिक समर्थता दाखवतो.

महाराजांच्या अमदानीत १६४८ मध्ये हा किल्ला नारो अप्पाजी यांनी मुघलांकडून जिंकून स्वराज्यात आणला.

या किल्ल्याला आणखी एक ऐतिहासिक संदर्भ आहे. औरंगजेबाच्या मुलाने, शाहजादा अकबरने, बापाशी म्हणजे औरंगजेबाशी फारकत घेऊन मोगलांची छावणी सोडली आणि तो मराठ्यांना येऊन मिळाला. त्यावेळी त्याने याच परिसराचा आसरा घेतला होता. त्याने या गडाच्या धोंडसे आणि नाडसूर परिसरात दीर्घकाळ आपली छावणी टाकली होती. हा परिसर सह्यादीच्या ऐन गाभ्यातला आहे. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे विश्वासू मिर्झा यहुद्दीन शुजाई, वकील अब्दुल हमीद आणि दुर्गादास राठोड अशी मोगलांच्या बाजूची नामवंत मंडळी होती. ही घटना संभाजीराजांच्या काळातली आहे आणि ही घडामोड या प्रदेशाचं बेलागपण ठसठशीतपणे दाखवते.

या जागेचं आणखी एक महत्त्व म्हणजे भोर संस्थानच्या पंत सचिवांच्या कुलदेवतेचं, भोराईदेवीचं देऊळ गडावर आहे. इथे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी जत्रा भरते. त्यामुळे या किल्ल्याला 'भोराईचा किल्ला' असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी या किल्ल्याचा उल्लेख 'घेरा सुधागड' असाही करण्यात आला आहे.

सुधागडच्या डोंगराचा घेर प्रचंड असल्याने पायथ्याचा परिसरही विस्तृत आहे. पायथ्याला नाडसूर, धोंडसे आणि वैतागवाडी अशी तीन गावं आहेत. यातल्या कुठल्याही गावातून गडावर जाता येत असलं तरी वैतागवाडीहून गडाच्या मुख्य वाटेला जाणारी पायवाट बऱ्यापैकी सोयीची आहे. पहिल्या अर्ध्या तासाची सपाटीवरची चाल सोडली तर गडापर्यंत जाणारी वाट गर्द रानातून जाते. मधला अर्ध्याएक तासाचा टप्पा प्रचंड दगडधोंड्यांचा आहे. साधारण पाऊण टप्पा पार केला की वाटेच्या बाजूलाच डावीकडे पाण्याची टाकी आहे. इथे कातळात कोरलेली 'बहिरोबा'ची प्रतिमा आहे.

गडावर रमतगमत जायला अडीच ते तीन तास लागतात. सगळा चढ अजिबात अंगावर येणारा नाही. गडाच्या सगळ्या उतारांवर प्रचंड रान असून यात भेकरं, कोल्हे, माकडं आणि तुरळक प्रमाणात अस्वलंही आहेत.

गडावर प्रचंड मोठी सपाटी असून या सपाटीवर मध्येमध्ये दाट जंगलाचे पुंजके आहेत. गडमाथ्यावर मोकळ्या जागेत भोराईदेवीचं चांगलंच मोठं आणि बऱ्यापैकी स्थितीत असलेलं देऊळ आहे. देवळाच्या गाभाऱ्याबाहेरच्या मंडपात पंचवीसेक जण सहज मुक्काम करू शकतात. बाहेरच्या पटांगणात शेकोटीभोवती बसून मोकळ्या वाऱ्यात गप्पाही मारता येतात. देवळापासून पाच मिनिटं चालत जाण्याच्या अंतरावर पण गर्द झाडीत पंतप्रतिनिधींचा त्यावेळी बांधलेला मोठा वाडा आहे. आता हा वाडा पडक्या स्थितीत असला तरी त्याच्या ओसरीत पंचवीसेक जण सहज राहू शकतात. वाड्याला मोठं कूस असल्याने सुरक्षितही वाटतं. या दोन्ही ठिकाणांपासून पाच ते दहा मिनिटांवर एक मोठं तळं आहे. पण इथलं पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इथे मुक्काम करायचा असल्यास सोबत पिण्याच्या पाण्याचा भरपूर साठा हवाच.

गडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरपूर प्रमाणावर साप आहेत. इतके की इथे परंपरेने 'अजिबात नांगरट करायची नाही', असा जणू अलिखित नियमच आहे. जो इथे नांगरट करेल त्याचा निर्वंश होईल, असा इथल्या स्थानिकांचा समज आहे. त्यामुळे रात्रीच्या शेकोटीसाठी किंवा जेवणासाठीचा लाकूडफाटा दिवसाच्या उजेडातच करावा. मुक्कामाच्या जागेची, त्यातही कोपऱ्यांची काटेकोरपणे तपासणी करून मगच तिथे राहावं.

नाडसूरला जाण्यासाठी ठाण्याहून सकाळी थेट बस आहे. याव्यतिरिक्त पालीहून बसने किंवा सहा आसनी रिक्षाने जाता येतं. गडावर लोणावळा-आंबवणे, तैलबैला करत 'वझरी'च्या खिंडीतून नाडसूर गाठता येतं. तसं मुळशी-पवना खोऱ्यातल्या जंगलातूनही हा परिसर गाठता येतो. मागतले इथले काही विस्तृत प्रदेश आजही निर्जन असल्याने अत्यंत माहितगार असणारा स्थानिक सोबत असणं आवश्यक आहे

रिफ्रेशिंग अर्नाळा



:


ठाणे जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल होतायत. कमीतकमी वेळात फिरण्याची ठिकाणं भटकंतीप्रेमींना हवीच असतात. त्याच लिस्टमधलं रिफ्रेश करणारं ठिकाण म्हणून अर्नाळ्याचं नाव आहे. होडीतला आनंद, बिचवरची मजा, ऐतिहासिक वास्तू, तसंच मासेखाऊंसाठी मेजवानीचं ठिकाण म्हणजे अर्नाळा.

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतून उमग पावलेली वैतारणा नदी याच अर्नाळा किल्ल्याच्या खाडीमुखाशी मिळते. इथे वैतरणा खाडीमुखाशी भर सागराच्या कुशीत वसलेल्या या अर्नाळा किल्ल्याने आपलं स्वतंत्र अस्तित्व जपलंय.

अर्नाळा गाठायला पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून १४ किमीवर अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे. किंवा वसईहूनही अर्नाळ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.

अर्नाळा बस स्थानक ऐन बाजारपेठेत असल्याने खाण्याची उत्तम सोय होते. बाजारातून मासळीचा वास घेत किनारा गाठायचा. किनाऱ्यावर कोळणी मासे विकताना, तर पुरुष कावड घेऊन बर्फ, मच्छीची वाहतूक करताना दिसतात.

किनाऱ्यावरून अर्नाळा बेटावर जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला फेरी बोट उपलब्ध आहे. साधारण पंधरा-वीस मिनिटात अर्नाळा बेट गाठता येतं. संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा. वाटेतच कोळ्यांची जाळी, होडीचे नांगर, सुकत टाकलेली मच्छी, खार लावलेली मच्छी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्य्र आणि हत्ती यांची सुबक शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर वेली-फुलांची बुट्टी आपल्याला खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमधे शके १६५९ मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो.

मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच गडाचं रूप खुलून दिसतं. सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूवेर्च्या तटाजवळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथे समोर गोड्या पाण्याचा तलाव बांधून घेतलेला आहे. तर तटांवर उत्खननात सापडलेल्या गणेशाच्या मूतीर्ची स्थापना केलेली आहे. इथूनच मागे वळून तटाच्या आतील बाजूने तटांवर जाण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटांवरच्या फेरीस सुरुवात करायची. एकूण नऊ बुुरूज असलेला आणि तीन प्रवेशद्वार असलेला हा किल्ला इतिहासात स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून आहे.

या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. १५१६ मधे केली. पुढे १५३० मधे हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर १७३७ मधे मराठ्यांनी जिंकला. या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं. असे दाखले इतिहासात सापडतात. बेटावर असलेल्या कालिका मातेचं दर्शन घायचं आणि पुन्हा किनारा गाठायचा.

निसर्गाच्या सान्निध्यातले दोन दिवस घालवून नव्या जोमाने कामाला लागू शकतो.


निसर्गराजा, ऐक सांगतो!



पावसाळा सुरू झाला की निसर्गवेड्यांना वेध लागतात ते वीकएण्ड पिकनिक्सचे. प्रत्येकातच एक निसर्गवेडा लपलेला असतो. शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यात आपली नेहमीची कामं सोडून वारंवार निसर्गाशी गळाभेट घेता येत नाही. पण पावसाळ्यात मात्र निसर्गाला उराउरी भेटण्यावाचून पर्यायच उरत नाही. लोणावळ्यासारख्या टिपिकल पावसाळी ठिकाणी जाणारे फॅमिली टुरिस्ट असोत किंवा डोंगराच्या कडेकपाऱ्यांमध्ये निसर्गाच्या हिरव्या दुलईवरून मुक्तपणे फिरणारे भटके असोत, पावसाळा आला की स्वत:च्याही नकळत झपाटल्याप्रमाणे निसर्गाच्या कुशीत शिरायला आपण आतूर होतो.

हल्ली त्याच त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा नवी ठिकाणं शोधण्याकडे कल जास्त आहे. लोणावळ्यासारख्या ठिकाणी भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पाण्यापेक्षा माणसंच अधिक असतात. काही वर्षांपूवीर् याचा उबग येऊन अशाच काही भटक्यांनी अॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराच्या कुशीत दडलेला एक अप्रतिम धबधबा शोधून काढला. आता मात्र भुशी डॅम इतकीच या धबधब्यावरही गदीर् उसळलेली असते. शिवाय, दारूड्या पर्यटकांचा त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळेच लोणावळा, माळशेज घाट यांसारखी दृष्ट लावणारी ठिकाणं फॅमिली टुरिस्टना नकोशी झाली आहेत. शिवाय, ट्रेकर मंडळींनाही या ठिकाणांचं फार आकर्षण राहिलेलं नाही.

लोणावळ्याच्या तुलनेत खंडाळा मात्र अजूनही पर्यटकांच्या गदीर्पासून काहीसा लांब आहे. पर्यटकांपेक्षा ट्रेकर्सचा ओढा खंडाळ्याकडे जास्त आहे, तो इथले हिरवेगार डोंगर आणि इथल्या प्रख्यात ड्युक्स नोजमुळं. रेल्वे ट्रॅक सोडून हिरवीकंच वस्त्र ल्यालेल्या डोंगराच्या कुशीत शिरलं की, बाहेरच्या जगाची कणमात्र आठवण राहात नाही. आपल्या खांद्यापर्यंत उतरलेले ढग, सतत रिपरिपणारा पाऊस, थंडगार हवा, जिकडे पाहावं तिकडे हिरवाईचं साम्राज्य... निसर्ग असा मोकाट सुटलेला असतो की त्याचं हे मुक्त बागडणं बघून आपल्याही मनात हर्ष दाटून येतो. शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटणारे आपण तिकडे मात्र निसर्गाचा हात पकडून तो नेईल तिथे त्याच्याबरोबर जातो.

खंडाळ्यापर्यंत जायची इच्छा नसेल तर त्याच्या अलीकडेही काही चांगली ठिकाणं आहेत, जी अजून तरी पर्यटकांच्या गदीर्पासून लांब आहेत. नेरळला उतरायचं ते माथेरानला जाण्यासाठीच. माथेरानचा पाऊस ही खास अनुभवण्यासारखी चीज आहेच; पण माथेरानपर्यंत पोहोचायच्या आधी स्टेशनपासून १५ मिनिटांवरच भान हरवायला अनुभव देणारं ठिकाण आहे ते म्हणजे टपालवाडी. स्टेशनला उतरून रस्त्यानं माथेरानच्या दिशेने पायी निघालं की, १० मिनिटांत उजव्या हाताला एक तलाव लागतो. या तलावावरून पुढे चालत गेलं की सामोरा येतो तो टपालवाडीचा धबधबा. हा सर्व परिसरच तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. शुद्ध हवा, नजर पोहोचेल तिथवर हिरवं साम्राज्य, आकाशातून सुरू असलेला पावसाचा अभिषेक आणि शुभ्र दुधासारखा वाहणारा धबधबा आणि हे सर्व ठाण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावर.

असंच एक ठिकाण कर्जतला आहे. त्याचं नाव आहे कोंडाणा केव्ज. राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या या बौद्धकालीन गुंफा अतिशय देखण्या आहेत. कर्जत स्टेशनला उतरून एसटी किंवा सहा आसनी रिक्षाने कोंदिवडे गावाला उतरलं की तिथून पायी चालत तासाभरात या गुंफापाशी पोहोचता येतं. इथूनच पुढे राजमाचीला जायचा रस्ता आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकातल्या या गुंफा काळाचे घाव सोसत अजूनही उभ्या आहेत. एक चैत्यस्तूप आणि सात विहार यांचा समावेश असलेल्या या गुंफातील कोरीवकाम दृष्ट लागण्यासारखं आहे.

ज्यांना डोंगरदऱ्यांत भटकण्याची हौस नसेल त्यांच्यासाठी मुंबई-ठाण्याच्या आसपास अनेक समुदकिनारे आहेत. अलिबागच्या समुदकिनाऱ्यावरही माणसांची गदीर् उसळलेली असते. पण अलिबागला लागूनच असलेले आक्षी, नागाव आणि रेवदंड्याच्या किनाऱ्यांवर मात्र तुलनेने कमी गदीर् असते. वरून कोसळणारा पाऊस आणि समोर उधाणलेला समुद हे दृष्य मन मोहून टाकणारं आणि चित्तवृत्ती भारणारं आहे. रेवदंड्याच्याच पुढे कोरलईचा किल्लाही पाहण्यासारखा आहे. या किल्ल्यावरून अलिबागपर्यंतचा समुदकिनारा दृष्टीपथात येतो. इथेच दीपस्तंभही आहे. मात्र, या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यामुळे जेमतेम मोटारसायकली इथे जाऊ शकतात.

ठाणे जिल्ह्यात डहाणू, बोडीर्चा समुद वीकएण्ड पर्यटनासाठी आदर्श आहे. डहाणू हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील विभाग म्हणून घोषित करण्यात आला असल्यामुळे इथे एखाद दोन अपवाद वगळता मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर अद्यापि टिकून आहे. पालघर, सफाळे, डहाणू, बोडीर् हा सारा परिसर म्हणजे निसर्गाची खाण आहे.

या शिवाय, ठाणे जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणून ख्यातकीर्त असलेलं जव्हार हेही वीकएण्ड पिकनिकसाठी आदर्श ठिकाण आहे.
original at - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3127845.cms

ठाणे जिल्ह्यविषयी | Thane Zilla Parishad

ठाणे जिल्ह्यविषयी Thane Zilla Parishad


ठाणे जिल्‍हयाविषयी माहिती
महाराष्‍ट्र राज्‍यातील काही मोजक्‍या औद्योगिकद्ष्ट्या प्रगत जिल्‍हयापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्‍तरेकडील जिल्‍हा आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वतांच्‍या रांगा तर पश्चिमेकडे अरबी समुद्र , उत्‍तरेस गुजरात राज्‍य तर दक्षिणेला जग प्रसिध्‍द मुंबई शहर अशा या जिल्‍हयाच्‍या चतु:र्सिमा आहेत. जिल्‍हृयाला 112 कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. जिल्‍हयाचे क्षेत्रफळ 9558 चौ. कि. मी. असून ते राज्‍याच्‍या 3.11 टक्‍के आहे. राज्‍यात क्षेत्रफळाच्‍या द्ष्टीने जिल्‍हयाचा 16 वा क्रमांक आहे. जिल्‍हयातील ठाणे, कल्‍याण, उल्‍हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, वसई व पालघर हे तालुके औद्योगिकद्ष्ट्या विकसित असून, मुंबई शहराच्‍या आधूनिक संस्‍कृतीच्‍या प्रभावाखाली आहेत. तर शहापूर, मुरबाड, वाडा, जव्‍हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू व तलासरी या तालुक्‍यांचा प्रदेश डोंगराळ असून आदिवासी वस्‍तीने व्‍यापलेला आहे. जिल्‍हयात जव्‍हार व सूर्यमाळ ही थंड हवेची तर अर्नाळा किल्‍ला, माळशेज व वज्रेश्‍वरी बोर्डी, केळवा ही निसर्गरम्‍य प्रेक्षणीय स्‍थळे पर्यटनासाठी प्रसिध्‍द आहेत. जिल्‍हयातील एकूण गावांची संख्‍या 1890 असून 6 महानगरपालिका व 9 नगरपालिका आहेत. ग्रामीण विकासाच्‍या दृष्‍टीने जिल्‍हयात एकूण 968 ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीची एकूण सभासद संख्‍या 7769 इतकी असून 9 नगरपालिकांमधील सभासद संख्‍या 291 आहे. त्‍याचप्रमाणे 6 महानगरपालीकामधील सभासद संख्‍या 535 तर ठाणे जिल्‍हा परिषद सदस्‍य संख्‍या 66 इतकी आहे. जिल्‍हयात शासकीय कर्मचा-यांची संख्‍या 46,498 इतकी असून जिल्‍हा परिषद कर्मचा-यांची संख्‍या 18,283 इतकी आहे. जिल्‍हयातील 9 नगरपालिका आणि 6 महानगरपालिका यातील कर्मचारी संख्‍या अनुक्रमे 3488 व 37471 इतकी आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे जिल्‍हयाची लोकसंख्‍या 8131849 इतकी आहे. लोकसंख्‍येच्‍या बाबतीत ठाणे जिल्‍हा हा मुंबई जिल्‍हयाच्‍या खालोखाल राज्‍यातील दुस-या क्रमांकाचा मोठा जिल्‍हा आहे. 72.58 टक्‍के नागरी लोकसंख्‍या असलेला ठाणे जिल्‍हा राज्‍यात मुंबई नंतर सर्वाधिक नागरीकरण झालेला जिल्‍हा आहे. राज्‍यात 10 लाखाहून अधिक लोकसंख्‍या असलेली 7 महानगरे असून त्‍यातील 2 महानगरे ठाणे जिल्‍हयातील आहेत. 1991 ते 2001 या दशकात जिल्‍हयाच्‍या लोकसंख्‍येत 54.92 टक्‍के वाढ झाली. ही वाढ राज्‍याच्‍या 22.57 टक्‍के वाढीपेक्षा 2.43 पटीने अधिक आहे. जिल्‍यातील ग्रामिण भागातील दशवार्षिक वाढ 20.12 टक्‍के इतकी होती तर नागरी भागातील दशवार्षिक वाढ 73.95 इतकी होती. नागरी भागातील ही वाढ राज्‍यातील इतर जिल्‍हयांच्‍या तुलनेत सर्वाधिक असल्‍याचे दिसून येते. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या एकूण क्षेत्रापैकी 3.11 टक्‍के क्षेत्र व्‍यापलेल्‍या ठाणे जिल्‍हयात 2001 च्‍या जनगणनेनुसार राज्‍यातील 8.40 टक्‍के व्‍यक्‍ती राहतात. ठाणे जिल्‍हयातील लोकसंख्‍येची घनता दर चौ. कि. मी. 851 इतकी आहे. तर राज्‍याचे हेच प्रमाण केवळ 315 इतके आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे जिल्‍हयात दर हजार पुरुषांमध्‍ये स्त्रियांचे प्रमाण 858 इतके आहे. राज्‍याचे हेच प्रमाण 922 इतके आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार जिल्‍हयातील अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्‍या अनुक्रमे 4.18 टक्‍के व 14.75 टक्‍के आहे. महाराष्‍ट्र राज्‍यात हे प्रमाण अनुक्रमे 10.20 टक्‍के व 8.85 इतके आहे. जिल्‍हयातील अनुसूचित जातीचे प्रमाण अंबरनाथ तालुक्‍यात सर्वाधिक 8.26 टक्‍के इतके असून अनुसूचित जमातीचे सर्वाधिक प्रमाण मोखाडा तालुक्‍यात 90.56 टक्‍के इतके आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाण जिल्‍हयातील 7 तालुक्‍यात 50 टक्‍के पेक्षा अधिक आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार जिल्‍हयातील एकूण काम करणायांची संख्‍या 31,79,981 असून ते जिल्‍हयातील लोकसंख्‍येच्‍या 39.11 टक्‍के इतके आहे. एकूण काम करणा-यापैकी शेतक-यांची संख्‍या 12.22 टक्‍के, शेतमजूर 9.64 टक्‍के, घरगुती उद्योगधंद्यात गुंतलेले कामगार 2.50 टक्‍के आणि इतर क्षेत्रात काम करणा-याची संख्‍या 75.64 टक्‍के इतकी आहे. एकूण काम करणा-या व्‍यक्‍तीपैकी स्त्रियांचे प्रमाण 23.17 टक्‍के आहे. राज्‍यातील हेच प्रमाण 34.78 टक्‍के इतके आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे जिल्‍हयातील साक्षरतेचे प्रमाणे 80.67 टक्‍के इतके असून राज्‍यात हेच प्रमाण 76.88 टक्‍के इतके आहे. जिल्‍हयातील ग्रामिण भागातील 64.45 टक्‍के तर नागरी भागात 86.56 टक्‍के व्‍यक्‍ती साक्षर असल्‍याचे दिसून येते. पुरुष व स्त्रिया यांचे जिल्‍हयातील साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे 80.00 व 73.10 टक्‍के इतके आहे. जिल्‍हयात प्राथमिक शाळांची संख्‍या 4518 असून त्‍यातील शिक्षकांची संख्‍या 23170 इतकी आहे. जिल्‍हयात प्रती शिक्षक विद्यार्थी संख्‍या 42 इतकी असून राज्‍याचे हेच प्रमाण 36 इतके आहे. जिल्‍हयात माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक शाळांची संख्‍या 956 इतकी असून वरिष्‍ठ महाविद्यालयांची संख्‍या 20 इतकी आहेत. जिल्‍हयात ग्रामिण भागात आरोग्‍य सेवा पुरविण्‍याकरीता 79 प्राथमिक आरोग्‍य केंद्र असून त्‍या अंतर्गत 487 उपकेंद्र आहेत. त्‍याचप्रमाणे कुटीर, ग्रामिण व इतर रुग्‍णालयांची संख्‍या 21 असून अतीदुर्गम भागात आरोग्‍य सेवा पुरविण्‍याकरीता 35 फिरती पथके कार्यरत आहेत.

Dahanu | Thane Zilla Parishad

Dahanu Thane Zilla Parishad

dahanu

Dahanu

Located on the western coastal line of India in Maharashtra, Dahanu is a charming seaside town with a huge sprawling beach. It borders Gujarat State and is surrounded by greenery on three sides and Arabian Sea in the west. The place, an ideal weekend getaway, is famous for its chikoo fruit. Dahanu is the largest manufacturer of balloons in the world.

मनातलं

ग्लोबलायझेशननंतर शहरीकरण झपाट्याने झालं आणि गावांची बकाल शहरं होऊ लागली. कोणत्याही नियोजनाशिवाय विकासाच्या नाव
ाखाली सिमेंटच्या जंगलांनी शेतजमिनींचा बळी जाऊ लागलाय. यावर ना कुणाचं नियंत्रण आहे ना कसले नियम... हे गाव अशा हजारो गावांचं प्रतिनिधित्व करणारं... माती हरवलेलं.

गाव तालुक्याचं नसलं तरी मोठं, बाजारपेठेचं. स्टॅण्डवर उतरून भरून वाहणारा पुणे-नाशिक रस्ता ओलांडला, की आपट्याचं पट्टी शेत. खरं तर बसस्टॅण्डची इमारत उभी राहिली या शेतातच. लांबूनच सीताआत्याचं घर दिसायचं. तिथे जरा टेकून चहापाणी झालं, की मळ्याकडे चालू लागायचं. हा फारतर पंधरावीस मिनिटांचा रस्ता. दोन्ही बाजूला शेतं. दिवाळीला गेलं, की डोक्यापर्यंत आलेली गच्च बाजरी दिसायची. पुढे हरणमुखाची शेतं. जरा हलकी. त्यात कडधान्य पसरलेली. मूग निघालेला असायचा. घरासमोरच्या अंगणात बढेमामा शेंगांचं वाळवण घालून बसलेले दिसायचे. दारातल्या शेळीला चारा टाकत सरसआत्याची 'आलीस का गं?' म्हणत जिव्हाळ्याने चौकशी. पुढे खरमाळ्यांची माडी. परिसरातली एकमेव. रंगीत बेल्जिअम काचांच्या त्या खिडक्यांचं लहाणपणी आकर्षण वाटायचं खूप. माडीशेजारी विहीर. भरपूर गोड्या पाण्याची. आजूबाजूच्या सगळ्या बायाबापड्या इथून पाणी भरायच्या. नळाचं पाणी गावापुरतं. इथे अजून ते सुख नव्हतं. सदासर्वकाळ रहाट वाजत राहायचा. तिथे मोट पाहिल्याचंही आठवतंय. त्यांच्या शेतात भाजीपाला, वगैरे. रस्ता आमच्या घरावरून पुढे मुळे वस्तीत जायचा. खाली कडूलिंबाची गच्च झाडं. चुलत्यांची शेतं, विहीर. भरपूर पाणी असलेला ओढा. काठाशी सीताफळांनी गच्च लगडलेली असंख्य झाडं. पायाशी बोरांचा सडा पडलेल्या बोरी. थोरातांची फळबाग. वस्तीपासून थोडं लांब त्यांचं घर...

काळाबरोबर धावताना गाव मागे पडलं तरी हेच चित्र मनावर घट्ट कोरलेलं. सुट्टीत जाणं व्हायचं. प्रत्येक वेळी झालेले बदल जाणवायचे. सगळ्यात आधी आपट्याच्या पट्टीत वडिलांनी घर बांधलं. जवळच बाजारसमितीची इमारत उभी राहिली. हॉटेलं झाली. बार झाले. रस्त्याच्या पलीकडचं गाव रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वाढू लागलं. हळूहळू शेतातली हिरवाई दिसेनाशी झाली. बाजरीच्या ताटांऐवजी आरसीसीचे पिलर्स दिसू लागले. रस्त्याच्या कडेला शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि थोडं आतल्या बाजूला हाऊसिंग सोसायट्यांची नावं मिरवणाऱ्या इमारतींनी शेतजमीन गिळून टाकली. नवश्रीमंतांच्या बंगल्यांच्या झोकदार कॉलन्या उभ्या राहिल्या. आजूबाजूच्या गावातले नोकरदार, शिक्षक, कामगार कुटुंबकबिल्यासह स्थिरावले. त्यांच्यासाठी अॅस्बेस्टॉसच्या पत्र्याच्या लांबलचक चाळी उभ्या राहिल्या. शेजारच्या तालुक्यातल्या एमआयडीसीत कामगार घेऊन जाणाऱ्या झोकदार बसेस दिसू लागल्या. वाढत्या गरजांना पुरं पडण्यासाठी जमेल तसं, जमेल तिथे गाव वाढू लागलं. घरापासून कॉलेजपर्यंत सुनसान वाटणारा रस्ता आता दोन्ही बाजूंना दिमाखदार इमारती घेऊन नांदता झाला. एकेकाळी गर्द हिरव्या झाडीत लांबूनही सहज ओळखू येणारी कॉलेजची टुमदार इमारत हळूहळू हरवत जाऊन दिसेनाशी झाली.

शेतकरी मात्र खुशालले होते. आधी एकरांवर चाललेली विक्री आता गुंठ्यांवर आली. हजारांत होणारे व्यवहार लाखांत होऊ लागले. रजिस्ट्रारच्या ऑफिसात नंबर लागेना. तुकड्यातुकड्यांनी शेतजमिनीचा बळी पडत राहिला. औत, नांगर दिसेनासे झाले. ज्या घरांत पोत्यांच्या राशी लागत तिथे महिन्याच्या किराण्याच्या यादीत पावशेर मूगही लिहिले जाऊ लागले. गाई गुरं आधीच बाजारात गेली होती. आता गाड्यांच्या शर्यतींच्या हौसेपोटी ठेवलेल्या बैलजोड्या फक्त राहिल्या. खादीच्या पांढऱ्याधोप कपड्यात मनगटावर, गळ्यात सोन्याच्या अवजड साखळ्या ल्यायलेली तरुण पोरं चौकात बाइकवरून उंडारू लागली. एकरभर शेत विकलं की महिंदची चकचकीत एसी गाडी दाराशी झुलू लागली.

चार सहा महिन्यांच्या गॅपने गावी जावं, तर जुन्या खुणा पुसून नवं काही तरी उभं राहिलेलं असायचं. घरापर्यंतच्या रस्त्यावर अनोळखी चेहरे वाढू लागले. मध्यंतरी एक मॉलही उभा राहिला. दहा वर्षांपूवीर् आठ हजार लोकवस्तीचं गाव आता पंचवीस हजारांचा आकडा ओलांडून गेलं. दुसऱ्या राज्यांतून आलेल्या तीन हजार जणांनी तिथे कायमचं बस्तान बांधलंय. चार हजार एकरांवर होणारी शेती दोन हजार एकरावर आलीय. डेवलपर नावाची जमात जोरात आहे. एजण्ट्सचं पिक आलंय.

गाव वाढतंय. सुजल्यासारखं. त्याला कसलं नियोजन नाही, कुणाचं नियंत्रण नाही. दोन इमारतींमधे फूटभर जागाही नाही. कधी काही अघटीत घडलं तर काय, याचा विचार नाही. प्यायला पुरेसं पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी भुतासारखं पहाटे उठायचं. जमिनीला भोकं पाडून पाण्यासाठी हजारो बोअर घेतलेत. सांडपाणी रस्त्यावर. घोंगावणारे डास, माशा. दर पावसाळ्यात ठरवल्यासारख्या साथी येतात. दवाखाने फुल्ल होतात. डेंग्यू, मलेरिया कायमचे पाहुणे. महामार्गावरचं गाव म्हणून एड्सचं बस्तान. टुमदार गावाचं बकाल शहर होताना असहायपणे बघणं एवढंच हातात उरलंय.

या दिवाळीत गावी गेले होते. पाडव्याचा दिवस. सकाळीच बाहेर पडलेला भाऊ दुपारी उशिरा परत आला. बरीच भूमीपूजनं आणि उद्घाटनं उरकून आलो म्हणाला. या वषीर् गावात तीन हजार नवे फ्लॅट्स तयार होताहेत, तो उत्साहाने सांगत होता. गावपण कधीच हरवलेल्या माझ्या गावाची मग आणखीनच काळजी वाटू लागली.

जगणं घडवायला शहरात गेलेली माणसं मातीच्या ओढीने पुन्हा गावात परततात म्हणे. ज्या गावात मातीच उरली नाही अशा गावाचं आता काय करायचं, हा प्रश्न तेव्हापासून छळतोय....

- प्रगती बाणखेले

original at - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3748370.cms

India's global art, proudly Tribal art!

Dahanu darshan

visit dahanu

dahanu's mahalaxmi

AYUSH - warli artsists at "adishilp - 2009" @hyderabad