Tarpa Mahotsav

Warli Painting

mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

updation in progress

Dahanu darshan

मोठ्या नकाशात Dahanu darshan [ Tribal tourism] पहा

रानात, फुलात; कोकणच्या गावात!




हातात रिझव्हेर्शन, तारांकित हॉटेलातील बुकिंग, ठरीव न्याहरी-जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे किंवा रिझॉर्टमधील तेच वातावरण...यांच्या बाहेर पडून स्वत: सहल आखून कोकणासारख्या हिरव्यागार प्रांतात जाण्याचा अनुभव घ्यायला हवा. तिथल्या एखाद्या छोट्याशा गावात, निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना काही दिवस राहायला मिळणे आणि सर्वांनी मिळून समूहजीवनाचा अनुभव घेणे, यातली मजा काही औरच...

...........

मे महिन्याच्या भल्या मोठ्या सुटीत करायचं काय, या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पडणारा प्रश्ान्च असतो. दहावीत आणि बारावीत जाणाऱ्या मुलांना तर आता मे महिन्याची सुटी असते, असे आपण म्हणतच नाही. त्यांचा लगेच अभ्यास सुरूही होतो. पण इतर मुलांपैकी काही जातात छंद वर्गात. काही सचिन तेंडुलकरच्या फोटोच्या पाया पडून, कीटचे ओझे सांभाळत मैदानावर जातात. काही लिटल चॅम्प होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गाणे शिकायला जातील. अर्थात, हे सारे न करणारीही हजारो मुले असतातच.

काही कुटुंबांमध्ये आता विचार सुरू होईल बाहेरगावी जाण्याचा. एखाद्या सहल कंपनीमध्ये भरभक्कम पैसे मोजून आठ दिवसांसाठी जायचे. ते ही घरातल्या तिघांनी किंवा चौघांनी. मात्र, अशा सहलींमध्ये जी प्रेक्षणीय स्थळे मोठ्या माणसांना बघायची असतात, ती पाहण्यात लहानग्यांना अजिबातच रस नसतो. त्यामुळे त्यांची रड, कंटाळा, धुसफूस सांभाळत; कधी त्यांना रागावत तर कधी प्रेमाने समजावत सगळ्यांबरोबर दिवसभर फिरत राहायचे आणि रात्री तारांकित हॉटेलात डोळे मिटत असताना शिरायचे. लहानग्यांचे आणि आपले कपडे जमेल तसे पिळून टाकायचे. मोबाईलवर सकाळी सहाचा गजर लावून झोपायचे. आणि खर्च बराच झाला पण आराम आणि पाहणे खूप झाले, असे म्हणत स्वत:चीच समजूत काढत परत मुंबई गाठायची. दुसऱ्या दिवशी धावपळ सुरू.

खरे पाहता आपल्याला आवश्यकता असते सैलसर व स्वच्छंदी जीवन जगण्याची. काटेकोर धावपळीचा, रोजच्या पोशाखी वागण्याचा आणि रोज आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांचा कंटाळा घालवण्याची.

थोडा विचार केला तर यातून आपल्याला चांगला मार्ग काढता येईल. आपल्याला आणि मुलांना मनमोकळे व मनसोक्त राहता येईल. घरी असणाऱ्या महिलांनी मुलांचे बाबा सोबत आले तर त्यांच्यासहित किंवा त्यांना जमणार नसले तर त्यांच्याशिवाय, आपल्या समवयस्क मैत्रिणींचा छानछोटा ग्रुप बनवावा. हा गुप तीनचार जणींच्यावर मात्र नसावा. मग कोकणातल्या एखाद्या खेड्यातले घर १५-२० दिवसांसाठी भाड्याने मिळवावे. आसपास थोडी चौकशी केली तर कोकणातल्या कितीतरी गावांमधली अशी घरे उपलब्ध होऊ शकतील. कोकणाचा हा सारा परिसर अत्यंत रम्य तर आहेच पण तो अत्यंत सुरक्षित प्रदेश आहे. कोणत्याही गावात कोणत्याही वेळी तुम्ही बिनघोर राहू शकता. फिरू शकता. या गावांमधले गावकरी काही त्रास तर देणार नाहीतच उलट जमेल तेवढी मदत करतील.

कोकणात आज बऱ्याच सोयी आहेत. तालुक्यांच्या ठिकाणी सुपर माकेर्टपासून-बँकापर्यंत सगळ्या सोयीसुविधा आहेत. सर्व गावांमध्ये पिशवीतून दूध मिळते. बहुतेक गावांमध्ये आता नळपाणी योजना आहेत. तिथे गॅस सिलेंडरही सहज मिळतो. दूरध्वनी सेवा खेडोपाडी पोहोचली आहे. गरज पडल्यास, डॉक्टरही आहेत. पण त्यांची गरजच भासणार नाही. मुंबईहून नेलेली औषधेही न वापरता परत आणावी लागतील.

परीटघडीची बांधिलकी नसल्यामुळे मोकळा-चाकळा वावर व मुलांचे उघड्या अंगाने दिवसभर झाडामाडात हुंदडणे, गुराढोरांचा आणि झाडाझुडपांचा अनोखा प्रेमळ सहवास हे सारे वातावरण मुलांना अनुभवू दे. इन्फेक्शन आणि परीटघडीचे मॅनर्स यांचा मुळीच बाऊ करू नका. सगळ्या भीती विसरून मस्त राहात येईल. मैत्रिणी मैत्रिणी मिळून रोज नवनवीन पदार्थ करून मनसोक्त खाता येतील. अशा वातावरणात मुले न कंटाळता एकमेकांमध्ये मिळून-मिसळून दिवसभर खेळत राहतील. दिवसभर खेळून दमून त्यांना रात्री मस्त झोप येईल. सकाळी उठून ती पाहतील तर एखादी मनीमाऊ त्यांच्या अंथरूणात येऊन झोपलेली असेल. तुम्हीही पहाटे अंगणात येऊन बसलात तर तुम्हाला समाधी लागल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

कोकणात जायला आता भरपूर वाहतुकीच्या सोयी सहज उपलब्ध आहेत. रेल्वे आहे, खासगी बस आहेत, एसटी आहेत. आराम बसमधील प्रवासापेक्षा, साध्या एसटीतून अवश्य प्रवास करून बघा. एसटीचे जाळे आता अगदी छोट्या गावांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, एसटीच्या वेळापत्रकातही खूप नियमितता आली आहे. एसटीतून प्रवास म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क. या अशा संपर्काचा अनुभव मुलांना जरूर घेऊ द्यावा. त्यातून त्यांच्या संवेदना अधिक जाग्या होतील. कदाचित्, न दिसलेले जगही त्यांना या प्रवासात दिसण्याची शक्यता आहे.

असे हे मुक्त प्रवासाचे १५-२० दिवस तुम्हाला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा देतील. तुम्हाला व तुमच्या मुलांना हे निसर्गाच्या सहवासातले अनुभव नक्कीच समृद्ध करतील. तुमच्या माणूसपणाला नवा आराम मिळेल. एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, आपसात देवघेव करून, लहानसहान श्रम एकत्रित करून मुलांवर एक वेगळाच संस्कार नकळत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राज्यातील एक प्रदेश त्यांना 'आतून' दिसेल, हा आणखी एक फायदा. समूहजीवनाचा एक नवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

साऱ्या गोष्टी तयार आणि जिथल्या तिथे मिळण्याऐवजी स्वत: आखणी करून अमलात आणण्यातही मजा असते. ती मजा अशा ट्रिपमुळे अनुभवता येईल. मग विचार कसला करताय? जमवा मित्रमैत्रिणी आणि मुलांना घेऊन स्वत: सफरीवर निघा!

India's global art, proudly Tribal art!

Dahanu darshan

visit dahanu

dahanu's mahalaxmi

AYUSH - warli artsists at "adishilp - 2009" @hyderabad